मनमाड शहरात जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी आठ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने मनमाड व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी, तालुका अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...






