loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – २२ दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या नगर परिषद प्रशासन विरोधात मनसेचा मोर्चा

Oct 18, 2022


यंदा दमदार पाऊस होऊनही मनमाड नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे मनमाड वासियांना २२ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने आज सकाळी नगर परिषद प्रशासन विरोधात मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. या प्रसंगी मनसे तर्फे नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले .निवेदनाचा आशय असा
मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर आहे. संपूर्ण मनमाड शहराला वागदर्डी धरण येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा पावसाळ्यात मनमाड शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे शहरातील सर्व नद्या नाले ओसंडून वाहत होते तसेच पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरणही ओव्हरफ्लो झाले. मात्र, धरण ओव्हरफ्लो होऊन देखील मनमाड शहरातील नागरिकांना मात्र भर पावसाळ्यात व अद्यापही 22 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे याचे मुख्य कारण मनमाड परिषदेच्या चुकीच्या पाणीपुरवठा नियोजन, मनमाड शहराला भर उन्हाळ्यात 13 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र पावसाळ्यात 22 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे याला सर्वस्वी मनमाड नगरपरिषद प्रशासन व पाणीपुरवठा विभाग जबाबदार आहे.
अंदाजे 2 लाख लोकवस्ती असलेल्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन देखील कमकुवत झाल्या आहेत. प्रत्येकवेळी पाणीपुरवठा होत असतांना कुठे ना कुठे पाईपलाईन फुटते त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो. मागील काही महिन्याआधी मनमाड नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना चलन भरुन जुन्या नळ कनेक्शन च्या ऐवजी नवीन नळ कनेक्शन बदलून दिले मात्र पाणीपुरवठा 22 दिवसाआड केला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मनमाड शहराला गेल्या दीड महिन्यापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरपरिषदेला विचारणा केली असता शहरात सर्वत्र पाणी सोडणारे वॉलमन यांचाही नियोजनाचा अभाव असल्याचे लक्षात आले, अनेक वॉलमन हे रिटायर्ड झाले अथवा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यानेही त्या जागी अस्थापना विभागाने नवीन कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे किंवा इतर विभागातील कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन नियुक्त करणे आवश्यक आहे. नियमित नगरपरिषदेची पाणीपट्टी भरुन देखील जनतेला 22 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मनमाड नगरपरिषद प्रशासनाने वर नमुद चुका सुधारल्याशिवाय तसेच पाणीपुरवठ्यावर सुयोग्य नियंत्रण केल्याशिवाय बदल होणे अवघड आहे. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास नगरपरिषदेने तयार राहावे.
पाणी हा मनमाडच्या जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा व ज्वलंत प्रश्न आहे. सणासुदीच्या काळात जर नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागत असेल तर आता जनतेची सहनशिलता संपल्यामुळे जनता देखील पाण्याची वाट पाहता पाहता नगरपरिषदेची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. शहरातील जनतेला एकत्र घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहाराच्या रस्त्यावर उतरुन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना ऑफीसला भेट न देता भर रस्त्यावर ओढून, तोंडाला काळे फासून प्रश्न विचारण्यात येईल व त्याची उत्तरे देखील अधिकाऱ्यांना त्याच रस्त्यावर द्यावी लागतील असा इशारा संपूर्ण मनमाडकरांच्या वतीने मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.