नांदगाव विधानसभेचे आमदार व शिंदे गटातील आ.सुहास कांदे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यावर आता यावर ठाकरे व शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आ.भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकत नाहीत, ज्या भाजप सोबत शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तीच भाजप आता शिंदे गटाला सुरुंग लावेल, अशी टीका केली आहे. तर शिंदे गटात कोणतीही नाराजी नसून सर्व आमदारांमध्ये चांगला समन्वय असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आ.शंभूराजे देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा
बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...