गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रेल्वेची धडक बसून ३ जणांचा मृत्यू झाला,यामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मृत तिघांची ओळख पटली आहे. डीसीपी ग्रामीण झोन डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी आणि दोन युवक रील बनवत असल्याची माहिती स्टेशन मास्टरकडून मिळाली होती. त्यानंतर भरधाव वेगात येणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेस गाडीने धडक दिल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण
मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...









