गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रेल्वेची धडक बसून ३ जणांचा मृत्यू झाला,यामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मृत तिघांची ओळख पटली आहे. डीसीपी ग्रामीण झोन डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी आणि दोन युवक रील बनवत असल्याची माहिती स्टेशन मास्टरकडून मिळाली होती. त्यानंतर भरधाव वेगात येणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेस गाडीने धडक दिल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे.
दिनांक :12/11/2025 कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...











