उच्च शिक्षण घेण्यासाठी आता भारतातील विद्यार्थ्यांना देशाबाहेर जाण्याची गरज नाही कारण देशातच परदेशी विद्यापीठांना सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या संदर्भातली नियमावली सुरू केली आहे. जगात टॉप 500 विद्यापीठांसाठी आता भारतात प्रवेशद्वारे खुली झाली आहेत. विशेष म्हणजे भारतातल्या विद्यापीठांसाठी असलेले नियम, आरक्षण, शुल्क नियमन परदेशी विद्यापीठांना लागू होणार नाहीत असं यूजीसीने जाहीर केल आहे. महिनाअखेरीस नियमावलीचा आराखडा अंतिम केला जाणार आहे. सध्या साधारणपणे 18 लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिकत आहेत. परदेशात शिकण्याऐवजी देशात राहूनच परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याची मुभा भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विद्यापीठांवर यूजीसीचं नियंत्रण नसेल.
नायलॉन मांजामूळे मनमाडला महिला डॉक्टर गंभीर जखमी
मनमाड - मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगउड्डाणाचा हंगाम सुरू झाला असताना, मनमाड शहरात...











