के आर टी शाळेत लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते .इयत्ता सातवीच्या प्रांजल गांगुर्डे नंदिनी कणकुसे या विद्यार्थिनींनी लालबहादूर शास्त्री विषयी आपले मनोगत व्यक्त केले .इयत्ता दुसरीच्या वेदांत वाघ. सिद्धेश पितृभक्त या विद्यार्थ्यांनी लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा केली होती .या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लालबहादूर शास्त्री हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान होते .लालबहादूर शास्त्री यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रुची निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीचा विरोध करण्यासाठी स्थापित केलेल्या वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. आणि त्यांनी एकूण सात वर्ष ब्रिटिश तुरुंगवासात घालवली. लालबहादूर शास्त्री अतिशय नम्र होते .स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेक मंत्रिपदे सांभाळली .व ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले .त्यांच्या समर्पित सेवेदरम्यान ते जनमानसात निष्ठा व क्षमतेसाठी लोकप्रिय झाले. त्यांनी देशाला “जय जवान जय किसान” ही घोषवाक्य दिले. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेले. 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी त्यांना मरणोत्तर ं भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनील जगताप यांनी केले. या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकादीपी. सौ सोनाली सरस्वती यांनी मार्गदर्शन केले.
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड
मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...







