मनमाड :(योगेश म्हस्के) शहराचे भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीन लालसरे यांना स्वामी विवेकानंद जयंती दिनी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दिला जाणारा ‘स्वामी विवेकानंद युवा गौरव’ हा मानाचा पुरस्कार जेष्ठ विचारवंत डॉ.श्री नरेंद्रजी जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मनमाड शहरात गेल्या 27 वर्षांपासून शहरातील सांस्कृतीक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असुन , गेल्या नऊ वर्षापासून समाजातील कला ,क्रिडा , राजकीय ,शैक्षणिक , वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय व्यक्तींचा युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.यंदाच्या वर्षीचा स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीनजी लालसरे यांना देण्यात आला. प्रा.श्री लालसरे हे मा.मुख्यमंत्री यांचे अत्यंत विश्वास पात्र अधिकारी असुन ,आपल्या पदाच्या माध्यमातून ते नेहेमी समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात , त्यांनी अथक परिश्रम करून आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते या पदापर्यंत पोहोचले असुन उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यांच्या याच कार्याच्या गौरव म्हणुन प्रा.श्री नितीनजी लालसरे यांना ‘स्वामी विवेकानंद युवा गौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याने समाजातील अनेक मान्यवर आणि मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












