मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका डब्यातील खालील भागातून अचानक धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही रेल्वे गाडी उगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यानंतर चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर ब्रेक दुरुस्त करत गाडी मनमाड च्या दिशेने रवाना झाली. यावेळी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस उगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत पोहचण्यासाठी हाल झाले.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











