मनमाड – काल दुपार पासून ढगाळ वातावरणानंतर रात्री नऊच्या सुमारास विजेच्या कडकडाटाने मनमाड शहर व परिसर अक्षरक्षः दणाणून गेले. साडेनऊच्या सुमारास अचानक शहराचा वीजपुरवठा पूर्ण खंडित झाला आणि अवकाळी पावसाला सुरवात झाली. शहर अंधारात बुडाले. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी शहर आणि परिसरात कोसळत होत्या. बदलत्या वातावरणामुळे शेतकरीही धास्तावले आहेत. एकीकडे शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकरी पुन्हा एकदा आसमानी आणि सुलतानी संकटात सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष आणि कांद्याच्या पिकाचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. नव्याने लागवड झालेल्या टोमॅटो पिकालाही ह्या हवामानाचा फटका बसणार आहे.
नायलॉन मांजामूळे मनमाडला महिला डॉक्टर गंभीर जखमी
मनमाड - मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगउड्डाणाचा हंगाम सुरू झाला असताना, मनमाड शहरात...











