राज्यात सध्या कांद्याच्या भावात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती.












