काल रात्री नांदगाव तालुक्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बळीराजा धास्तावला असून शेतमालाला भाव नाही आणि त्यात वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. तसेच हिरे नगर येथे वीज पडून नारायण नामदेव बिन्नर यांच्या दोन म्हशी दगावल्या असून त्यांची अंदाजे किंमत अडीच लाख आहे.














