loader image
[ays_poll id=7]

शासनाने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे – ६०० रुपये देण्याची शेतकऱ्याची आर्त हाक

Mar 15, 2023


कातरवाडी ताः चांदवड येथील शेतकरी भागवत झालटे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची रक्कम प्रति क्विंटल रुपये ६०० करण्याची मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक वाया गेले आहे. शेतकरी संपावर गेल्यावर सगळं महाग होईल कुठलाही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा बाजारात येऊ दिला जाणार नाही दूध व सर्व पालेभाज्या त्यामुळे सरकारने लवकरात लवकर विचार करून भाव निश्चित करावे आणि अनुदान रू.600 जाहीर करावे सोयबीन, कापूस, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी ४००-५०० रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ६00 रुपये करावे, अशी मागणी शेतकरी सामाजिक कार्यकर्ता भागवत झाल्टे यांनी केली आहे. शेतकरी वारंवार असमानी सुलतानी संकट सापडत आहे त्यात चांदवड तालुक्यातील गावामध्ये नुकसान भरपाई चे पैसे मिळत नाही फक्त शेजारी देवल्यातच मिळतात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्या पिकावर नांगर रोटर फिरवत आहे भाजी पाला हि कवडीमोल भावात विकला जात आहे अतिवृष्टीमुळे खरिप वाया गेला आणि आता पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कांद्याने तर यावेळी शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी ११०० ते १२०० रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासच विंटलला ३०० रुपये लागतात हा खर्च पाहता सरकारने जाहीर केलेले ३०० रुपयांचे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर सरकार मेहरबान असल्याचे चित्र दाखवण्यात आले. घोषणाच घोषणा करण्यात आल्या आहेत प्रत्यक्षात मात्र हे सरकार शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेत दिसून आले आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करून किमान ६००.रु प्रमाणे कांद्याला अनुदान द्यावे.

एक शेतकरी भूमिपुत्र श्र भागवत राजाराम झाल्टे कातरवाडी तालुका चांदवड


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.