मालेगाव येथे शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी एक ‘कांदा’ किती खोक्यांना विकला गेला या विधानावर आमदार कांदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची नार्कोचाचणी घ्यावी. त्यात कुणी खोके घेतले ते स्पष्ट होऊन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल असे आव्हान नांदगावचे आमदार सुहास कांदे
यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. रविवारी सायंकाळी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील जाहीर सभेत एक कांदा किती खोक्याला विकला गेला अशी खोचक टिप्पणी केली होती होती होती.
आमदार सुहास कांदे यासंदर्भात म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ आणि वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांनाकडून किती खोके स्वीकारले हे ही जनतेला कळेल.











