एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २.आज अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे नविन गरोदरची नाव नोंदणी करुन १००० दिवसाचे महत्व सांगण्यात आले..
गरोदर पणापासुन ते बाळ २ वर्ष होईपर्यन्तचा कालावधी म्हणजे बाळाचे पहिले १००० दिवस होय. गरोदर पणात गरोदर स्त्रीने सरकारी दवाखाण्यात नाव नोदंणी करुन बाल व माता संरक्षण कार्डवर वजन ,उंचीची नोंदणी करुन चार तपासण्याच्या नोंदी करावी..लसिकरण ,गोळ्या औषधे वेळेत घ्यावे..संतुलित आहार घ्यावा .प्रसुती नंतर अर्धा तासाच्या आत बाळाला चिकाचे दुध द्यावे,, आणि सहा महिने निव्वळ स्तनपान,, सहा महिने पुर्ण झाल्यावर बाळाला वरचा पुरक आहार सुरु करावा..पुरक आहार देतांना आहारात विविधता ठेवायची आहे.. त्यासोबत दोन वर्ष स्तनपान ही सुरु ठेवावे..एक हजार दिवस बाळाची काळजी घेतली तर बाळ सुदृढ निरोगी रहाते.सुदृढ बालक हेच देशाचे उज्वल भविष्य आहे..
फलक रेखाटन – मतदान जनजागृती
मतदान जनजागृती फलक रेखाटन. --...









