महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षात आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी व भारताला दिशा देण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे विचार आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. अरुण पाटील यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.गजानन शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, प्रा. विठ्ठल फंड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी. व्ही.अहिरे यांनी केले.
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...











