मनमाड : योगेश म्हस्के – संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता
सुदिक्षा जी महाराज यांच्या असिम कृपेने
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा-मनमाड यांच्या वतीने युगप्रवर्तक बाबा गुरूबचन सिंह जी महाराज यांच्या आठवणीत (मानव एकता दिवस) निमित्ताने
रक्तदान शिबिर संत निरंकारी सत्संग भवन मनमाड येथे भव्य स्वरूपात संपन्न झाले.
सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन श्री. बलराज बाळकृष्ण कर्णे संयोजक सेक्टर मनमाड,श्री. वासुदेव भोईर क्षेत्रीय संचालक, श्री. प्रदीप गुजराथी , श्री. कासव साहेब ,
डॉ.श्री.सुनील बिडगर , डॉ.श्री.शिवाजी लहाडे नाशिक सिविल, डॉ.अंकिता पवार मालेगाव सिविल आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले . या शिबिरात संत निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक , शहरातील सामाजिक संस्था , विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून मानवतेच्या दृष्टीकोनातून 172 युनिट रक्त संकलन करण्यात मोलाचे योगदान दिले .
शिबिरात श्री सचिनकुमार पटेल मुख्याधिकारी म.न.पा. , श्री पाईक साहेब, डॉ. संतोष गुप्ता, डॉ.सचिन देवळे , डॉ विजय राजपूत , श्रीपंकज खताळ, श्री मयुर बोरसे, श्री रोशन टिवलेकर बी.पी.सी.एल., श्री योगेश म्हस्के पत्रकार, श्री विक्रम सप्रे , श्री शुभम गायकवाड सह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या.
बाल सत्संग मधील बालकांनी बाल प्रदर्शनी च्या माध्यमातून मिशनच्या कार्याचा आलेख मांडून सामाजिक योगदान रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, जल स्रोत स्वच्छता मोहीम आणि चित्रकलेच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्व, पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत उपस्थितांची मने जिंकली , आपल्या व्याख्यानात बोलताना श्री बलराज बाळकृष्ण कर्णे सेक्टर संयोजक यांनी सर्वांचे आभार मानले.













