loader image
[ays_poll id=7]

आजपासून लागू झाले हे महत्वाचे पाच बदल – जाणून घ्या

May 1, 2023


भारतात सोमवार 1 मे 2023 पासून 4 मोठे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा परिणाम थेट देशातील नागरिकांच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या हे बदल

1. व्यावसायिक सिलेंडर झाले स्वस्त

भारतात सोमवार 1 मे 2023 पासून 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 171 रुपये 50 पैसे स्वस्त झाला आहे. आता 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 856 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात एलपीजी पुरवठादार कंपन्यांनी बदल केलेला नाही.
दरकपात केल्यानंतर मुंबईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 808 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 960 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. दिल्लीत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 856 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. चेन्नईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2 हजार 21 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे.
2. ATM ट्रान्झॅक्शन फेल झाले तर लागणार चार्ज

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. पीएनबी ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे त्याचे एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले तर संबंधित ग्राहकाला दंड लागू होणार आहे. प्रत्येक अशा स्वरुपाच्या फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनसाठी दहा रुपये दंड अधिक जीएसटी एवढा मोठा एकूण दंड लागू होईल. पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना मेसेजद्वारे या बदलाची माहिती कळवण्यात आली आहे. बँकेच्या वेबसाईटवर नोटीस प्रसिद्ध करून या बदलाची माहिती देण्यात आली आहे. हा बदल सोमवा 1 मे 2023 पासून लागू झाला आहे.
3. टाटा मोटर्सच्या कारच्या किंमतीत बदल

कार विक्रीच्या बाबतीत सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने सर्व कार मॉडेलच्या किंमतीत 0.6 टक्के वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आउडीने क्यू थ्री आणि क्यू थ्री स्पोर्टबॅक यांच्या किमतीत 1 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच क्यू 8 सेलिब्रेशन, RS5 आणि S5 या कारच्या किंमतींमध्ये आउडी कंपनी 4 लाख रुपयांपर्यंत वाढ करणार आहे.

4. ग्राहकांच्या पैशांआधारे नवी बँक गॅरेंटी नाही घेऊ शकणार ब्रोकर

स्टॉक ब्रोकर आणि क्लीअरिंग मेंबर ग्राहकांच्या पैशांआधारे नवी बँक गॅरेंटी घेऊ शकणार नाही. आधीच दिलेली अशा स्वरुपाची गॅरेंटी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत संपुष्टात येईल.

5. 7 दिवसांत अपलोड करावी लागेल पावती

ज्या कंपनीचा एकूण कारभार (उलाढाल / टर्नओव्हर) 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या कंपनीला सोमवार 1 मे 2023 पासून त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे इनव्हॉईस हे इनव्हॉईस रजिस्ट्रेशन पोर्टल अर्थात आयआरपीवर 7 दिवसांच्या आत अपलोड करणे बंधनकारक आहे. आधी अशी डेडलाईन नव्हती. जे टॅक्स पेअर नियमाचे पालन करतील त्यांनाच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
.