मनमाडशहर विरशैव गवळी समाज स्मशानभूमीत विविध अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत असून ह्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे असे निवेदन फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपालिका प्रशासनला देण्यात आले
महोदय,
निवेदनाचा आशय असा मनमाड ते मालेगांव कडे जाणाऱ्या हायवेवरील डावीकडे शहराच्या मध्यभागी विरशैव गवळी समाजाची स्मशानभुमी आहे या स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनिय झाला असून तो रस्ता त्वरित सिमेंट काँक्रीट करण्यात यावा तसेच रोडच्या अगदी बाजुने भिंत नसल्याने अनोळखी इसम, प्रवासी, आपले वाहन थांबवून स्मशानभुमी जवळ लघुशंका करत असतात.
तसेच या स्मशानभुमीला एक लोखंडी मोठा गेट असणे गरजेचे आहे कारण नेहमी या स्मशानधुमित कुत्रे, मांजर मोकाट जनावरे हैदोस घालत असतात या ठिकाणी रात्रीच्या वेळी सभामंडपाच्या जागी नेहमी अंधार असतो त्याकरीता त्वरीत हायमास्ट लाईटची व्यवस्था करावी तसेच सभामंडपाच्या ठिकणी ऑईलपेंटने मोठ्या अक्षरात विरशैव गावळी समाज स्मशान भुमी असे नाव टाकण्यात यावे जेणे करून येणाऱ्या जाणाऱ्या व लघुशंका करणाऱ्या आनोळखी प्रवाशांना माहिती होईल व स्मशान भुमिच्या बाजुला कोणी लघुशंका करणार नाही.
तसेच साइडने त्वरीत संरक्षण भिंत बांधावी व साफसफाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर बेग चाचा,
हाजी मुश्ताकसर
शकुर शेख
कैलास हिरणवाळे
मा.नगरसेवक
विलास आहिरे सचिव,फिरोज शेख कार्याध्यक्ष,
हाजी शफीभाई
आमिन नवाब शेख
सुनिल गवळी
मा. नगरसेवक
ज्ञानेश्वर शिंदे उपाध्यक्ष,
इस्माईलभाई पठाण,सददाम आतार,
वसंत हिरूभाऊ गवळी
अकुश गवळी,
पापा थॉमस
हाजी रफिक,
शरद बहोत.
आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.













