शिंगवे येथे आज नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आदिवासी वस्ती व गावात प्रभात फेरी काढली. या नवभारत साक्षरता कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे सर व माळी सर गायकवाड सर, वाले सर यांनी विद्यार्थ्यांना नवभारत साक्षरता अभियाना संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे,शिंगवे ग्रामपंचायतचे सरपंच श्री आत्माराम खताळ, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख श्री किरण बोरसे तसेच विद्यालयाचे खताळ सर, माळी सर, वाले सर,गायकवाड सर,देवरे सर, शेळके सर, झाल्टे मॅडम, संजय अहिरे, दीपक पाटील, समाधान मढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा सत्कार
नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड...











