loader image
[ays_poll id=7]

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

Jun 29, 2023


मनमाड :- ”आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन- ओबीसींना शिक्षणाच्या क्षेत्रात आणणारे पहिले छत्रपती नाहीत तर क्रांतीबा महात्मा फुले यांच्या नंतर सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती करणारेही पहिले छत्रपती आहेत. सामान्य जनतेचा जीवनात शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन राजसत्तेचा वापर प्रथमतः जनतेसाठी करणारे शाहू महाराज हे खरोखर राजर्षि होते,” असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीतील तरुण – अभ्यासू कार्यकर्ती अलका नागरे-साळवे यांनी केले.
राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्ताने मनमाड बचाव समिती, सत्यशोधक मंच, जनहित विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. मनोज गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात ” ओबीसी आरक्षण आणि राजर्षि शाहू महाराज” या विषयावर अलका नागरे बोलत होत्या.
”विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात प्रथम पारित केला तर ओबीसी समाजातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैलजोडी देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरचे ते दुसरे छत्रपती होते. आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गोठविले जात असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली जात आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करून आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून महागडे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु असून आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या ओबीसी बहुजनांना,शेतकऱ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले जात आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न ओबीसी समाजासमोर असताना धर्म-जात यांच्या झगड्यात ओबीसींना गुंगविले जात आहे. ओबीसींनी हे कारस्थान एकजुटीने हाणून पाडले पाहिजे,” असे आवाहनही नागरे यांनी केले.
प्रारंभी मुस्लिम पखाली(भोई) समाजाच्या वयोवृद्ध कार्यकर्त्या खुर्शीदबी शेख यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करण्या आले. मनमाड शहरातील विविध ओबीसी समाजातील ३७ घटक जातींनी मेळाव्यात सहभाग दिला असता घटक समाजाच्या प्रमुखांचा रामदास पगारे, कमल जाधव, सतीश केदारे, अलका नागरे, रश्मी मोरे, मोतीराम भालेराव, मनोज गांगुर्डे, सुनीता महाले व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वश्री सदाशिव सुतार, नरेंद्र कांबळे, भागीनाथ सोनार, सतीश केदारे आदींनी मनोगतातून ओबीसी एकतेचे आवाहन केले. शाहीर अर्जुन साळवे यांनी ‘ ओबीसी डेटा कुठं हाय वो ‘ हे गीत गाऊन सर्वांची वाहवा मिळवली. सूर्यकांत राजगिरे, अशोक परदेशी, राम महाले आदींनी प्रास्ताविकातून विविध भूमिका मांडल्या. आर.बी. ढेंगळे, चंद्रकांत जाधव, महेश दारुंटे, अमर चव्हाण आदींनी संयोजन केले. रतन निकम यांनी आभार प्रदर्शित केले. सुषमा तिवारी, सुनीता राजगिरे, शांताबाई पटवार, सुरेश वाघ आदींनी सह्योग दिला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.