शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत बारा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले. धुळ्याचे एसपी संजय बारकुंड यांनी सांगितले की, या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर गावात मंगळवारी सकाळी घडली. महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या डंपर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडकून बसस्थानकावर धडकली.
मनमाड ता. २७ : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.
[contact-field...











