loader image
[ays_poll id=7]

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

Jul 25, 2023


मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात उभारल्या जाणाऱ्या ३ नव्या जलकुंभाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे विशेष प्रयत्न करत आहे. करंजवण धरणात २७ मीटर उंच व ८ मीटर रुंदीची जॅकवेल (विहीर) उभारण्याचे काम सुरु झालेले असून पैकी १५ मीटर उंचीचे काम झालेले आहे. उरलेल्या १२ मीटरचे कामास अर्धवट सोडावे लागले आहे. करंजवण धरणात पावसाचे पाण्याचा साठा वाढल्याने झालेल्या १५ मीटरच्या कामापर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे हे काम थांबवावे लागले आहे. या योजनेअंतर्गत मनमाड शहरातील माऊली नगर, मुरलीधर नगर आणि जयजवान ढाब्यालगतच्या वसाहतीत प्रत्येकी एक जलकुंभ उभारण्याचा कामाला ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात येणार असून येत्या ५-६ दिवसात पहाणी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या जागेबाबतचे प्रस्ताव पाटबंधारे व त्याच्याशी संबंधित विभागाकडे मंजूरीसाठी पाठविलेले असून येत्या १५-२० दिवसात त्यास मंजूरी मिळून करारनामा करण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. लवकरच हा करार होत असून करंजवण योजनेतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी ह्या ठरल्याप्रमाणेच होत असून योजनाही ठरलेल्या मुदतीत कार्यान्वयीत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे शहराला जीवनदायी ठरणारी ३१२ कोटी रुपयांच्या करंजवण योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर तत्काळ जलद गतीने कामकाज सुरू असून लवकरात लवकर योजना पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास कांदे प्रयत्नशील आहे.

जलवाहिनी टाकण्यासाठी २० स्पॉटपैकी १२ ते १५ ठिकाणी गॅप भरुन पुर्ण करण्याचे काम वेगाने होत आहे. मानसी रोज १३५ लिटर पाणी मिळण्यासाठी एकूण १५ लहान-मोठ्या टाक्या बनविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जलवाहिनी योजना ही ऑईल कंपन्यांप्रमाणे – कंप्युटरराईज फायबर ऑप्टिकलने नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे कुठेही एक थेंब पाण्याची गळती झाल्यास लगेच माहिती मिळणार आहे. त्यामुळे जलवाहिनीतून पाणी चोरणे अशक्य होणार आहे..


अजून बातम्या वाचा..

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...

read more
खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

मनमाड - चेन्नई येथे होणाऱ्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा किशोर व्यवहारे,कृष्णा...

read more
दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम...

read more
.