loader image
[ays_poll id=7]

पाणी चोरी करतांना आढळल्यास होणार कडक कारवाई – वैभव भागवत

Aug 11, 2023


मनमाड शहरासह मनमाड रेल्वे स्थानक, आंबेगाव ग्रामपंचायत, येवला शहर आणि तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे. सदर पाणी बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्यालगत कोणी जर पाणीचोरी करतांना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिला आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून शासनमान्य असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी बिगरसिंचनचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यात मनमाड पाणी पुरवठा योजना, मनमाड मध्य रेल्वे पाणी पुरवठा योजना, आंबेगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, येवला शहर पाणी पुरवठा योजना, येवला तालुका ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धरणात पाण्याचा येवा कमी असल्याने पालखेड डाव्या कालव्यावरील बिगरसिंचन संस्थांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हे आवर्तन बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्या लगत असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांनी या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करून पाणीचोरी करू नये. अशा स्पष्ठ सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे. पाणी चोरी करतांना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण –  शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण – शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

वेळीच रुग्णाचे लक्षणं बघून क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपचार सुरु केल्याने रुग्णाचे प्राण...

read more
नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या...

read more
माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ)...

read more
.