loader image
[ays_poll id=7]

पाणी चोरी करतांना आढळल्यास होणार कडक कारवाई – वैभव भागवत

Aug 11, 2023


मनमाड शहरासह मनमाड रेल्वे स्थानक, आंबेगाव ग्रामपंचायत, येवला शहर आणि तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे. सदर पाणी बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्यालगत कोणी जर पाणीचोरी करतांना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिला आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून शासनमान्य असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी बिगरसिंचनचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यात मनमाड पाणी पुरवठा योजना, मनमाड मध्य रेल्वे पाणी पुरवठा योजना, आंबेगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, येवला शहर पाणी पुरवठा योजना, येवला तालुका ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धरणात पाण्याचा येवा कमी असल्याने पालखेड डाव्या कालव्यावरील बिगरसिंचन संस्थांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हे आवर्तन बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्या लगत असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांनी या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करून पाणीचोरी करू नये. अशा स्पष्ठ सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे. पाणी चोरी करतांना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

read more
वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
.