हा सोहळा भव्य दिव्य व सुसज्य अश्या वातावरणात पार पडला.
दि.15ऑगस्ट स्वारगेट पुणे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे यांच्या वतीने गुणवंण विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार वितरण महासोहळा, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला.
प्रथम श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व श्री अमोलजी निवळकर व कु सोहम गुहागरकर यांच्या ऑनलाइन निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यामधे नाशिक जिल्हातील वडनेर भैरव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष शुक्लेश्वर जाधव यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच श्री उमेश रमेश खैर ( गुहागर ), श्री अनिल तुकाराम नरवणकर (पिंपरी चिंचवड ) यांनाही समाजभुषण पुरस्काराने तर श्री कृष्णा रामचंद्र अंबिरकर,(चिखली )यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विषेश गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व गुणवंत गृहिणी सन्मान पुरस्कार यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री कृष्णा अंबिरकर तर प्रमुख उपस्थिती श्री रघुनाथजी (आण्णा) गौडा नगरसेवक , श्री तुकारामजी जाधव ( कोकण वासीय महासंघ पुणे.) संस्थापक अध्यक्ष कोकणरत्न श्री चंद्रकांतजी चिवेलकर, हे समाज संघटित करून सर्वाना एकसूत्रांत बांधण्याचे कार्य अविरत पणे करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावेळीही सुंदर आयोजन नियोजन केले गेले. उपाध्यक्ष समाजरत्न गजानन बगावडे,यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सह उपाध्यक्ष अशोकजी शिरकर ,खजिनदार राजेन्द्रजी पडवेकर सौ, सुरेखा साळवी आदी पदाधिकारी व इतर मान्यवर, समाज बांधव या सोहळ्यात उपस्थितीत होते. हा कार्यक्रम फेसबुक च्या माध्यमातून महाराष्ट्र भर लाईव्ह प्रसारीत केला व ऑफलाईन उपस्थिती मधे तर डोळ्याचे पारणें फेडणारा सोहळा बघितल्यावर सर्वांनी मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे देश भक्ती पर गीत,तबला वादन,नृत्य, मंगळागौर गाण्यावर सुंदर नृत्य सादरीकरण केले. विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.समाज संघटित झाला तर सर्वांचाच विविध अंगी विकास होईल. व समाज प्रगतीपथावर गरुड भरारी घेईल. या संस्थेच्या माध्यमातून ही दिग्गज मंडळी हे कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वक्तव्य नगरसेवक रघुनाथजी गौडा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे संघटक समाजरत्न श्री संतोष साळवी व सौ जोत्स्ना साळवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री मदन व्हालकर यांनी मानले आणि पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली.
” व हा सोहळा समाजाच्या कार्याला गती देणारा व सर्वांच्या अंगात कार्याची ऊर्जा निर्माणकरून बळदेणारा दैदीप्यमान सोहळा ठरला”













