loader image

रक्षाबंधन उत्सवानिमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम….

Sep 1, 2023


मनमाड : येथील जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने रक्षा बंधन उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्य रस्त्याच्या चौकात स्टॉल लावून जाणाऱ्या-येणाऱ्या समाज बांधवांना राखी बांधून आपल्या कार्याची माहिती देत सामाजिक एकात्मता जपण्याचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ जनजाती कल्याण आश्रम असा फलक लावून अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी , सचिव शशिकांत भागवत , खजिनदार दामोदर पवार सर मार्गदर्शक प्रकाश गाडगीळ सर व अन्य कार्यकर्ते वाहतूक करणाऱ्या सर्व समाज बांधवांना , पादचारी , दुचाकी चारचाकी , रिक्षचालकांना स्टॉल जवळ थांबवून आकर्षक असे माहिती पत्रक देत आपल्या कार्याची माहिती देऊन आणि हाताला राखी बांधून बंधूभावाचा संदेश प्रत्यक्षात देत होते . दुपारी चार वाजता सुरू केलेला हा उपक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता व सुमारे चारशे ते पाचशे बांधवांना राखी बांधून हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या उपक्रमासाठी हेमंत पेंडसे , प्रमोद मुळे , आनंद काकडे , अक्षय सानप , महेश नावरकर , रमाकांत मंत्री , अजय , अथर्व लाळे , विक्रम सप्रे व अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला अशाच प्रकारचा आणखी एक कार्यक्रम कॅम्प विभागात मारुती मंदिराच्या परिसरात देखील करण्यात आला , त्याठिकाणी श्रीधर सांगळे , सुनील पगारे आणि कातकडे बंधूंच्या सहकार्याने मोहन कीर्तने यांनी पुढाकार घेतला सर्व कार्यक्रमाला रंगनाथजी कीर्तने यांचे मार्गदर्शन लाभले .


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
.