loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात २० तासाहुन अधिक काळ बत्ती गुल

Nov 27, 2023


 

नांदगाव – मारुती जगधने दिनांक २६ रोजी सायंकाळी ५ वा गेलेला वीज पुरवठा तब्बल वीस तासांनी सुरळीत झाला. संपुर्ण रात्र बत्ती गुल झाली होती. नांदगाव ते मनमाड दरम्यान वादळ वार्यात विजेच्या तारा तुटून विजपुरवठा बंद झाला होता.
मागील एका वर्षात प्रथमच २० तास बत्ती गुल झाल्याची घटना घडली मागील काळात नियमित वीज सुरळीत असायचा पण झालेल्या वादळवारा आणी गारपिटीचा फटका महावितरणला बसला वीज खंडित असल्याने नांदगाव कराना रात्र जागून काढावी लागली दरम्यान च्या काळात वीज बंद असल्याने भ्रमणध्वनी ,पिठाच्या गिरण्या,आँनलाईन सेवा, पाणीपुरवठा आदी बंद होते. दि २७ रोजी दुपारी १ वा विजपुरवठा सुरु झाला त्या नंतर ही विजेचे लपंडाव सुरूच होते दुपारचे ४ वाजेले तरी वीज विस्कळित होती.
विजसुरळीत करणे कामी वीज यंञना कामाला लागली असून विजपुरवठा सुरळीत करणे कामी युद्धपातळीवर काम चालू असल्याचे विश्वसनीय सुञांनी सांगीतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.