loader image

तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविणारे संकट मोचन आमदार सुहास अण्णा कांदे – योगेश (बबलू) पाटील

Dec 10, 2023


तालुक्यात गेल्या काही दिवसात जाणवणारा दुष्काळी रूपाने अस्मानी संकट असतानाच पुन्हा काही दिवसांपूर्वी जोराचं वादळ,वारा पाऊस गारा यांनी शेतकरी बंधूंच अतोनात नुकसान केलंय तालुक्यात कोणी कोणाचं सांत्वन करावं अशी परिस्थिती निर्माण झालीय…आणि राज्यात राजकारणाचा चिखल…!हे सर्व पाहता आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सुहास आण्णा कांदे मात्र जोमाने व भक्कम पणे तालुक्यातल्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतांना दिसताय.सत्तेत राहून प्रसंगी सत्ताधाऱ्यांशी कटुता घेत अनेक विकास कामांच्या निधीचा ओघ मात्र तालुक्यात कायम ठेवत यशस्वी वाटचाल करतांना दिसताय.
गेल्या 40 वर्षातील सर्वश्रुत असणारा मनमाडचा पाणी प्रश्न सोडवण्यात अण्णांची बाजू हि अजरामर राहील परंतु या पाठोपाठ नांदगावचा देखील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी अजून 50 कोटींचा निधी देखील मिळवला.
आता कुठे महत्वाचे प्रश्न मार्गी लागताय असं असतानाच पुन्हा एक संकट मनमाड येवला रेल्वे पूल कोसळून समोर आलं व सर्वांचीच अतोनात हाल बघून पुन्हा एकदा शासन दरबारी आपली कैफियत मांडत 3 कोटींचा निधी मंजूर करून आणला.
एकामागे एक संकट कदाचित देव सुद्धा जनतेची व जननायकाची परीक्षा घेतोय की काय असच वाटतंय परंतु आता कुठलंही संकट आलं तरी आपल्या पाठीमागे आण्णा खंबीर पणे उभे आहे हि भावना प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये आता रुजली आहे आणि त्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे गारपीट व वादळात अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्येकाला धिर दिला व छत्रहीन झालेल्या महिलांना आपल्या पदरचे पैसे देऊन तात्काळ घर सुस्थितीत करून देण्याच्या सूचना केल्यात.
प्रत्येकाच्या सुख-दुःखात हिरीरीने भाग घेताना अण्णांना आम्ही नेहमीच बघतो.
खऱ्या अर्थाने तालुक्याला अण्णांच्या रूपाने एक संकटमोचन मिळाले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही…
तालुक्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या कर्तृत्वान विकास पुरुषाचे मनापासून आभार…
असे माजी नगराध्यक्ष योगेश बबलू पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.