मनमाड – काही दिवसांपूर्वी मनमाड पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जोडणारा मनमाड शहरातील एक
मात्र रेल्वे ओव्हर ब्रिज अचानक कोसळला, रेल्वे ओव्हर ब्रिज दुरुस्त करून वाहतूक पूर्वरत सुरु करण्यास एक ते दोन महीण्याचे कालावधी लागणार आहे, तरी या भागात राहणारे नागरिक पर्याय नसल्याने आपली दुचाकी, चारचाकी वाहने पुलाच्या बाजूने पार्क करतात तरी मागील दिवसात काही वाहने चोरी गेल्याच्या घटना घडत आहे तसेच जो पर्यायी मार्ग संबंधित विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे तो खूप लांबचा रस्ता असून रात्रीच्या वेळी सुरक्षित नाही त्या रस्त्यावर देखील लुटमारीच्या घटना घडत आहे तरी यावर लवकरात लवकर आपल्या पोलिस ठाणे मार्फत योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी शेलार यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.
मनमाड पोलीस ठाणे अंतर्गत येणारे कैम्प, रमाबाई नगर, भारत नगर आनंदवाडी, गोदावरी, सुभाष नगर, नजराना, हबीब नगर, दावत नगर, 28 युनिट, शकुंतला नगर, आयोध्या नगर, बाप्पु नगर, महानंदा नगर, शांती नगर, श्रावस्ती नगर रेल्वे फिल्टर, हाऊस रेल्वे कॉलनी, नगर चौकी, सोबत वांजरवाडी, करी, एकवई, लोहशिंगवं, भालूर, मालेगाव कर्यात, अंकाई तांडा, अनकवाडे, या ग्रामीण भागातील गावांचा, सुमारे 35 ते 40 हजार लोकसंख्येचा मनमाड शहराशी संपर्क तुटलेला आहे, तरी या भागात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूल दुरुस्त होई पर्यंत पुलाच्या कडेला येवला रोडच्या दिशेने तात्पुरत्या स्वरुपात एक पोलीस छावणी व वरील भागात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख उ बा ठा गट माधव शेलार यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.












