loader image

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

Dec 26, 2023




नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणा वरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आज पाटाला पाणी सोडण्यात आले.
एन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. याप्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवाडी सह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असे मत व्यक्त केले.
पन्नास वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठपुराव्या मुळे आज आपल्या पाटाला पाणी आल्याचा आनंद मलाही होत असल्याचे सांगितले, लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले. तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे शेरूळ हिसवाळ या गावांना लिफ्ट द्वारे पाणी मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचे तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीतला पाणी मिळेल असे काम करायचे आहे असे मत व्यक्त केले.
मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आजरोजी धरणात पाणीसाठा कमी आहे. या मुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. यानुसार २९ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले, या मुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कळवाडीसह चिंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकुर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका झाली असून जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी डीजे लावत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे गावात स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी कळवाडी गटातील सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले, यशवंत देसले, प्रदीप सर देसले, रोहित जाधव, बाळू शेठ बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदा भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले, जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पीडी चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेशी, किशोर बोराळे, विलास परदेशी, महेश शेरेकर, सुरेश अहिरे, मिनराम शांताराम मगर, दिलीप मगर, आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.