नांदगांव : मारुती जगधने
येथे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य अयोजन भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर, निमगाव मंडल आणि भाजपा नांदगांव तालुका तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा तळा गळातील, गोर गरीब, गरजू होतकरू महिलांना कसा मिळेल आणि या कल्याणकारी योजनांचा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास, सक्षम बनण्यास कशा प्रकारे मदत देणारे आहेत. या बद्दल महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रिय राज्य मंत्री मा. ना.डॉ. भारतीताई पवार, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ तसेच संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड या होत्या त्यांच्या समवेत व्यासपिठावर जिल्हा सरचिटणीस संजय सानप, विधानसभा प्रचार प्रमुख पंकज खताळ होते तसेच व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक तालुका अध्यक्ष गणेश शिंदे(उत्तर), मनिषा काकड(दक्षिण), शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, शिवाजी कराडे(निमगाव मंडल), महिला मोर्चा अध्यक्षा छाया बोरसे(उत्तर), सुवर्णा आहेर(दक्षिण), मिनाक्षी हिरे(निमगाव मंडल), माजी नगरसेवक व माजी शहर अध्यक्ष राजीव धामणे, अन्नपुर्णा जोशी(म. मोर्चा शहर अध्यक्षा), तारा शर्मा(शहर उपाअध्यक्षा), अक्षदा कुलकर्णी, ॲड. मनिषा पाटील, ताराताई सोनवणे(सरपंच-सकोरा व मा. पंचायत समिती सदस्या), चंदा पाटणी(मा.ता.उपाध्यक्षा) आदी उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमात ना. भारतीताई पवार यांनी नविन तंत्रज्ञानाचा वापर महिलांना रोजगार निर्मिती साठी कसा करता येईल हे उदाहरणे देऊन समजावुन सांगितले. तसेच विजयजी चौधरी यांनी महिलांना स्वावलंबी होण्याचे मार्ग सांगितले व सरकार आपल्या कोणत्याही अडचणीत आपली मदत करेल याचे आश्वासन दिले. तद नंतर शंकरराव वाघ आणि ॲड. जयश्रीताई दौंड यांनी देखील उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला राजेंद्र पवार(वरिष्ठ प्रशिक्षक महा.बँक आर. सेटी), संजय सोमवंशी(उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र), रविराज बेलेकर असे व्यवहार, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ पदाधिकारी व यशस्वी महिला उद्योजिका मनिषा इंगळे, आशा कदम, अर्चना आढाव आदी उद्योजिका यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि उद्योगासाठी प्रेरीत केले. उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लाऊन आणि तीळ गुळ वाटुन त्यांना ना.पवार यांच्या हस्ते वान देण्यात आले व भाजपा महिला पदाधिकारी यांच्या कडून ना. पवार यांना हळदी कुंकू आणि तीळ गुळ वाटुन वान देण्यात आले.
मा.ना.डॉ. पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केल्या नंतर स्वतः हाताने कमळाचे चित्र काढून भाजपा च्या दिवार लेखनाचा कार्यक्रम व हनुमान टेकडी येथील संत जनार्दन महाराज मंदीर येथे स्वच्छ्ता करीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेल्या मंदीर स्वच्छतेचा कार्यक्रमही राबविला. सदर मंदिर स्वच्छतेच्या कार्यक्रमात ना. पवार, विजयजी चौधरी यांच्या समवेत शंकरराव वाघ, ॲड. जयश्रीताई दौंड, संजय सानप, पंकज खताळ, गणेश शिंदे, मनिषा काकड, राजाभाऊ बनकर, राजीव धामणे, सोमनाथ घोंगाणे आदी कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
सदर कार्यक्रमास सतिष शिंदे, मनोज शर्मा, भगवान सोनवणे, संदिप पगार, प्रशांत इनामदार, भगवान व्हाडगर, फिरोज खाटीक, बबन मोरे, सतिष आहीरे, अण्णा काळे, दिनेश दिंडे, धम्मवेदी बनकर, दत्तु शेलार, अरुण पवार, हिरा सानप, डॉ. कारभारी आहेर, प्रविण पवार, वंश पटाईत आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.












