मनमाड – रविवारी शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुतळ्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मेघ डबरीत बसवलेल्या या पुतळ्याचे दिमाखदार व भव्य लोकार्पण सोहळा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणावर आतिष बाजी करण्यात आली.
शिवपुतळ्याचे पुजन, रायगडावरील पवित्र जलाने जलाभिषेक आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमोंनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ च्या जय घोषाने परिसर दणाणून गेला होता.या प्रसंगी आमदार कांदे म्हणाले, की शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी मी केवळ प्रयत्न केले आणि त्याला यश आले आणि आज लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे आणि उपस्थितांच्या वतीने आमदार कांदे, सौ अंजुमताई कांदे आणि फरहान खान यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते यांच्या हस्ते पूर्णाकृती पुढा उभारल्याबइल आमदार सुहास काद, अंजूम कांदे , फरहान खान यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना नेते राजेंद्र भाबड, अल्ताफ खान, साईनाथ गिडगे, नाना शिंदे, भाजाचे नेते नितीन पांडे , मुख्याधिकारी शेषराव चौधरी, विविध मान्यवरांचे भाषणे झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केले. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री छत्रपतींच्या पुतळ्याजवळ शिवशाहीर सुरेश जाधव यांचा शाहिरी जल्सा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने मनमाडकर, संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

















