नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, सदर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदारांशी संपर्क साधून यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केल्या.
शहर परिसरासह ग्रामीण भागात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले. यामध्ये रब्बी पिकातील मका डाळिंब, शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची माहिती घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज आमोदे या गावी तहसीलदार सुनील सौंदाणे, कृषी अधिकारी गाडे, आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
आमोदे येथील शेतकरी विठ्ठल पुंडलिक पगार,संजय पगार बाबाजी पगार, गणेश पगार, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, डाळिंब शेवगा,पिकांची प्रतिनिधिक स्वरूपात पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.
आमोदे येथील सरपंच सौ वैशाली पगार, सदस्य विठ्ठल पगार, उपसरपंच भूषण पगार,कृष्णा पगार, रामकृष्ण पगार, समाधान पगार,वाल्मीक पगार, तलाठी तुषार येवले,कृषी सहाय्यक राहुल जैन आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे हे मुंबई ला असून मनमाड नांदगाव शहरासह मतदारसंघात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना तहसीलदारांना दिल्या , तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहसंबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती देऊन मदत देण्याची मागणी केली आहे.

















