नांदगाव : मारुती जगधने आम्ही समजु शकतो सध्या निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत पण किमान आपल्याकडे आलेल्या व्यक्ती कोण आहे याची थोडीतरी तमा तहसिलच्या काही अधिकार्यांनी बाळगावी?
तालक्याच्या घडामोडींचे केद्रबिंदु असलेल्या अद्यावत तहसिल शासकिय इमारत बांधून १० वर्षे झाली पण महिलांसाठी स्वच्छताग्रहाची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी एक नामवंत महिला ज्या देशातील एका शासकिय नामांकित कंपनीच्या उच्चदर्जाच्या पदावर आहे अशा या नामांकित महिला
नांदगाव येथील तहसिल कार्यालयात खाजगी कामानिमित्त आल्या होत्या तेव्हा त्यांनी स्वच्छता ग्रहाची विचारणा केली परंतु स्वच्छता ग्रहाची व्यवस्था नसल्याचे एक महिला शिपायाकडुन सांगण्यात आले याच दरम्यान एकाच आडनाव असलेल्या अधिकार्याकडे सहीसाठी गेले असता त्यांनी मी नव्हे ते दुसरे आहे आणी ते आहे की नाही माझ्या पाठीला डोळे नाही असे उध्दट उत्तर देत त्या सभ्य व्यक्तीला अपमानित केले. नंतर एका समजदार अधिकार्याना समजताच त्यांनी पटकन सही करुन दिली.
एकंदरीत तहसिल कार्यालयातील ठराविक अधिकार्यांच्या उध्दट वर्तनामुळे संपुर्ण तहसिल विभागाचे नाव बदनाम होत असते सध्या तहसिलमध्ये पिण्याचे स्वच्छ पाण्याची
व्यवस्था नाही,महिलांना स्वच्छताग्रह नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे .
दरम्यान अनेक महिला येथे कामनिमित्त येतात पण येथे महिलासाठी स्वच्छताग्रह नसल्याने महिलांची घोर कुचंबना होत असते.
मनमाड ता. २७ : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.
[contact-field...











