नांदगाव – ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा) वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेउन त्यांच्या मागण्या त्वरीत मान ्य करण्यात याव्या अशी मागणी नांदगाव तालुका सकल ओ बी सी समाजाच्या वतीने निवेदन देत करण्यात आली आहे.बडीमोडी ता. अंबड जि. जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नांदगांव तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांच ा आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
ओबीसी आरक्षणा संदर्भात मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगेच्या मागण्यामुळे केवळ ओ बीसी चे आरक्षण धोक्यात आले आहे असे नाही तर दलित, आदिवासीचे आरक्षण देखील धोक्यात आले आहे. मनोज जरांगेच्या मागण्याप्रमाणे जात वैधता तांना “सगे सोयरे हा शब्द कसोटयांमध्ये समाविष्ट Ajustes SC/ST/OBC मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा ‘महामार्ग निर्माण होईल व आरक्षणाला अर्थही राहणार नाही.
मनोज जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट सर्व मराठ ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास सुप्रिम कोट ांचा अवमान होईल.
घटनेच्या 15 (4) 16 (4) व 340 परिच्छेदानुसार मराठ्यांना आ रक्षण असंविधानिक आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने निजामकालीन खोट्या क ुणची नोंदी व सुके आयोग यांच्या कार्यपध्दती संशयास्पद असल्याचे सिध्द झाले आहे.
उपोषणकर्ते ओबीसी नेते प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ (आबा) वाघमारे यांच्या मागण्या त्वरीत मान्य करण्यात यावीत, जात वैधता कसोटयां मध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करु नये.
वडीगोद्री ता. अंबड जि. जालना येथे उपोषणास बसलेले उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ (आबा) वाघमारे यांच्या उप रोक्त मागण्या महाराष्ट्र शासनाने त्वरीत मान् य करुन उपोषण आंदोलनाची सांगता करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
या सर्व मागण्या मंजूर करून उपोषणाची सांगता त्वरीत न केल्यास न ही शासनाची राहील याची नोंद घ्यावी
उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत बिकट होत असून त्यातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ शकतो याबाबत शासनाने गांभियनि दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन
सकल ओबीसी समाज
नांदगांव तालुक्यातरफे देण्यात आले असून निवेदांची प्रत
प्रत माहितीस्तव
मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य
मा. उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य
मा. प्रांताधिकारी, येवला यांना पाठविण्यात आली आहे.