नांदगाव : मारुती जगधने
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या जयंती निमित्त हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प छञपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.असा सुर या प्रसंगी उमटला.
२६ जून नांदगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सारनाथ बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फरहान खान हे होते तर दीपप्रज्वलन भास्कर निकम, विलास कोतकर विश्वास आहिरे यांनी केले.
या प्रसंगी छञपती शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
डॉ. ख्याती तुसे,मनिषा पाटील (वन रक्षक) संगीता वाघ, अॅड विद्या कसबे अनिता पाटील यांनी पुजन केले तर
छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने पत्रकार संजीव धामणे,योगेश (बबलू) पाटील, सागर हिरे,संतोष कांदे,मारुती जगधने,राजू जाधव, आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच अॅड विद्या कसबे, सुनील जाधव,भास्कर निकम, पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे यादींनी आपले मनोगत व्यक्त करुन या सुंदर अशा वृक्षारोपन करुन जयंतीचं अभिवादन करुन या संकल्पनेचं कौतुक करून ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार महावीर जाधव यांनी मानले तर
प्रास्ताविक
माजी नगरसेवक नितीन जाधव यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत गरुड़ (अध्यक्ष), दीपक मोरे (उपाध्यक्ष)
प्रमोद पगारे, किरण पवार, सोमनाथ चौधरी,गौतम काकळीज, सोहेल रंगरेज़,प्रवीण इघे,जफर शेख,राज पवार,अली शेख, स्वप्निल इघे, कुणाल भोसले, गौरव गूढेकर.आदी उपस्थित होते.