चांदवड – चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष आहे. चांदवड येथील विश्रामगृहच्या बाहेर गणुर चौफुलीवर चांदवड तालुक्यातील भुमीपुत्र डॉ श्याम पगार यांनी कांदा प्रश्नी कृषी दिनापासून दि.१जुलै २०२४पासुन अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.याआंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात,निर्यात धोरण, क्विंटल चार हाजार रुपायाखाली निर्यात शुल्क नसावे, क्विंटल पाच हजार वर टप्या टप्याने निर्यात बंद करायला हरकत नाही.पण निर्यात बंद केल्यावर वीस टक्क्यांपेक्षा जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली जावी अशा आमच्या शेतकर्यांचा प्रश्नः कामी अन्नत्याग उपोषण करित आहे.या संदर्भात उपोषण कर्ते व शेतकरी यांनी अधिकाधिक माहिती दिली.बाईट डॉ श्याम पगार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी












