मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे हुतात्मा दिन व महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी आपल्या मनोगतात “भारताच्या राष्ट्रीय जडण-घडणीत महात्मा गांधींच्या विचारांचे अतुलनीय योगदान आहे”. असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले सर, पर्यवेक्षक प्रा. डी.व्ही. सोनवणे सर तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. बी. परदेशी यांनी केले.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











