मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे हुतात्मा दिन व महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी आपल्या मनोगतात “भारताच्या राष्ट्रीय जडण-घडणीत महात्मा गांधींच्या विचारांचे अतुलनीय योगदान आहे”. असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले सर, पर्यवेक्षक प्रा. डी.व्ही. सोनवणे सर तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. बी. परदेशी यांनी केले.
मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरात 33 रक्त बॅगचे संकलन
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय,मनमाड येथे रक्तदान...









