loader image
[ays_poll id=7]

वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले

Jul 12, 2025


नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना जी विसंगती दिसते तिला विनोदाची झालर दिली तर त्यातून वात्रटिकेचा जन्म होतो; असे प्रतिपादन मनमाड येथील कवी हेमंत वाले यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात कवी हेमंत वाले ‘मनातले काही’ या आपल्या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक सुहास टिपरे होते .हेमंत वाले पुढे म्हणाले की ,वात्रटिका लिहिताना राजकीय चर्चेतून अनेक मुद्दे सापडतात आणि तेच खाद्य वात्रटिकेसाठी महत्त्वाचे असते.कोणावरही टीका करता येत नाही पण वात्रटिकेच्या माध्यमातून प्रहार करण्याची संधी कवी शक्यतो सोडत नसतो.मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची ताकद कवी आपल्या साहित्यात निर्माण करतो. त्यासाठी प्रसंग सावधानता बाळगली तर ते साहित्य समाज सुधारणेला प्रेरणा देते, असे सांगून त्यांनी काही वात्रटिका सादर केल्या. पोपट देवरे आणि राजेंद्र देसले या भाग्यवंत श्रोत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिरी यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
.