मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. बकिमचंद्र चटोपाध्याय रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्षपूर्ण होत आहेत. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा इतिहास व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर भाषणे सादर केलीत. मराठी विभागाचे प्रा विठ्ठल सातपुते यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य श्री पी. के बच्छाव, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा देविदास सोनवणे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन हिंदी विभागाचे प्रा देवेंद्र पवार यांनी केले तर आभार पी. व्ही. अहिरे यांनी मानले.











