शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत राज्यातील शेतकरी राजा आपली शेती सांभाळत आहे. शेती सोबतच आता शेतकरी बांधव पर्यायी उत्पन्नाच्या साधनांकडे वळत आहे, त्यातच सौर ऊर्जा निर्मितीसाठी जमीन भाड्याने देणे हे शेतकरी बांधवांसाठी एक कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन होऊ शकते.
अनेक शेतकरी बांधवांकडे नापीक व पोट खराबा असलेली शेतजमीन असते, सदर जागेवर सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीद्वारे शेतकरी बांधवांशी दीर्घकाळासाठी करार करून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी केली जाते, त्यामुळे शेतकरी बांधवांना एकरामागे एका वर्षासाठी जवळपास 50000 रुपयांपर्यंत वार्षिक भाडे मिळते, यासाठी कोणत्याही कृषी विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक नाही आणि दरवर्षी हमखास उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित देखील सुधारणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्याकडे असलेल्या नापीक जमिनीपासून हमखास उत्पन्न मिळविण्याच्या या पर्यायाचा विचार केला पाहिजे.











