
या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली. काहींनी पाटी-पावडे घेऊन साचलेला कचरा व पालापाचोळा हटविला. या मोहिमेमुळे उद्यान परिसर स्वच्छ व सुशोभित दिसू लागला.
यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी संत कैकाडी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी मनमाड शहरात पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करत संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या आदर्शाचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. “आपले घर, अंगण, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश शेकदार, निलेश वाघ, अशोक बिदरी, गणेश केदारे, रामदास सोनवणे, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, उपनगराध्यक्ष मुकुंद एळीजे, नगरसेवक अमजद पठाण, बब्बू कुरेशी, गटनेते पिंटू शिरसाठ, सुनील हांडगे आदी उपस्थित होते.










