loader image
[ays_poll id=7]

भाषेचा गौरव म्हणजे संस्कृतीचा गौरव : प्राचार्य डॉ. अरुण पाटील

Mar 4, 2026


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा संपन्न

मनमाड – येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील बोलत होते. त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, त्यातील गोडवा, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, प्राचीन मराठी, शिवकालीन मराठी ते आधुनिक मारठी याचा सांगोपांग आढावा घेतला. बोली भाषेतील अभिव्यक्तीमुळे मराठी भाषा समृद्ध आहे असेही ते म्हणाले. भाषेचा गौरव म्हणजे संस्कृतीचा गौरव, ती भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचा गौरव असल्याचे त्यानी सांगितले. सुरुवातीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. धनराज धनगर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ. राहुल लोखंडे यांनी मानले.

यावेळी काव्यवाचनात एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नवोदित कवींच्या कवितांमध्ये आई, वडील, मन, प्रेम, निसर्ग असे विषय होते. वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक सौ. वर्षा जयंत कुलकर्णी, द्वितीय क्रमांक कु. रचना विजय चंदनशिव, तृतीय क्रमांक रुपेश बाळू सरोदे यांनी पारितोषिके पटकावली. तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून स्वाती मार्कंड (प्रथम क्रमांक), विशाखा शिंदे (द्वितीय क्रमांक), गौरी मार्कंड (तृतीय क्रमांक) यांनी यश संपादन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
.