
मनमाड : मनमाड शहरात गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून अनेक वेळा तासन्तास वीज गायब राहत आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व व्यावसायिक वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने मनमाडकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना मनमाड शहराच्या वतीने कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग मनमाड यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विजय करे साहेब, असिस्टंट पोलीस निरीक्षक भंगाळे साहेब ही आंदोलनामुळे मनमाड शहरातील कायदा सुव्यवस्थेसाठी उपस्थित होते. संतापलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी तत्काल आंदोलनाची हाक देऊ नये अशी विनंती नवनियुक्त कार्यकारी अभियंता प्रजापती साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता करेरा साहेब, उप कार्यकारी अभियंता नलावडे साहेब, तसेच शहर अभियंता कुमावत साहेब, सहाय्यक शहर अभियंता दत्तात्रेय सांगळे यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांनी केली सदरील अभियंता यांनी नुकतेच शहरात पदभार स्वीकारला असल्याने त्यांना अडीअडचणी सोडवण्यास वेळ द्यावा अशी विनंती MSEB अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने शिष्ट मंडळाला केली. सदरील विनंतीस मान देऊन त्यांना परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला.
यामध्ये २४ तास कार्यरत तक्रार निवारण केंद्र सुरू करून स्वतंत्र मोबाईल क्रमांक उपलब्ध करणे, विभाग १ व २ मधील देखभाल कामांची माहिती जाहीर करणे, हुडको व इतर फिडर्सच्या वीजखंडित कालावधीचा तपशील देणे, मुख्य बाजारपेठ, दवाखाने व शाळांचा परिसर पाकीजा वाहिनीवर जोडणे, घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती न करणे, स्मार्ट मीटरच्या बिल दुरुस्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे, नवीन उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करणे, तसेच वागदर्डी फिडर व ३३ केव्ही लिंक लाईन संदर्भातील विविध तांत्रिक मागण्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, मनमाडकर जनतेच्या हिताच्या या सर्व मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर जनतेसोबत तीव्र जनआंदोलन उभारेल. तसेच आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या बैठकीतील चर्चेमध्ये शिवसेना मनमाड शहराचे शहरप्रमुख मयूर बोरसे, नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपप्रमुख सुनिल हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, जिल्हा संघटक नाना शिंदे, नगरसेवक अमजद पठाण, दिनेश घुगे, रत्नदीप पगारे, लोकेश साबळे, युवासेना शहराधिकारी आसिफ शेख, निलेश ताठे, मुकुंद झाल्टे, राजेंद्र जाधव, सचिन दरगुडे, सनी पगारे, सतीश भुरे, ऋषिकांत आव्हाड, सनी बागुल, रवी चव्हाण, जाकीर शेख, राकेश ताठे, निलेश व्यवहारे उपस्थित होते.










