loader image
[ays_poll id=7]

कलम १५५ च्या वापरावर राज्य सरकारकडून निर्बंध!

Sep 2, 2026


महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आता या कलमाचा वापर महसूल नोंदी, सातबारा किंवा भूमी अभिलेखातील केवळ साध्या लेखन व टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यापुरताच मर्यादित राहणार आहे.
त्यामुळे राज्यात आता जमिनीचा मालकीहक्क, क्षेत्रफळ किंवा हक्कसंबंधी नोंदींमध्ये बदल करण्यासाठी कलम १५५चा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे सातबारा व महसूल नोंदीत मनमानी पद्धतीने बदल करण्यास आळा बसेल. किरकोळ चुका दुरुस्त करण्यापुरताच कलम १५५चा वापर मर्यादित राहिल्याने जमिनीच्या मालकीहक्काशी संबंधित नोंदी सुरक्षित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

प्रभाग क्रमांक सात व नऊ येथील होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

प्रभाग क्रमांक सात व नऊ येथील होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू...

read more
मनमाड रेल्वे कॉलनीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे लाहोटी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

मनमाड रेल्वे कॉलनीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे लाहोटी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

मनमाड रेल्वे कॉलनी मध्ये दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असे...

read more
.