
समाज संस्कारक्षम घडविण्यात शिक्षकांचा वाटा खूप महत्वाचा असतो, या उक्तीला सत्यात उतरवत नाशिक जिल्ह्यातील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी जिल्ह्याचा ठसा संपूर्ण देशावर उमटवला आहे.
नुकताच कुंदा बच्छाव यांचा देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
ज्ञानभिंती, तरंग वाचनालय, स्मार्ट स्कुल यासारखे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना बँक, बाजार, वृद्धाश्रम, इस्रो आणि विधानभवनाला भेटी देऊन विमानप्रवासाचा अनुभव मिळवून दिला.
कुंदा बच्छाव यांच्या या राष्ट्रीय बहुमानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










