रेल्वे तर्फे नुकतीच उधना नंदुरबार पुणे या अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु सदर गाडीला नांदगावला थांबा नसल्याने सदर गाडीला नांदगावला देखील थांबा देण्यात यावा यासाठी नांदगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी दिली आहे. नांदगाव येथून पुणे येथे जाण्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त आणि सोयीची ठरणार असल्याने नांदगाव स्थानकावर देखील गाडीला थांबा मिळणे गरजेचे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
नकाशावरील पाणंद रस्त्यांची आता सातबारा उतार्यावर नोंद होणार
राज्य शासनाने राज्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आता भूमी...











