loader image
[ays_poll id=7]

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

Sep 19, 2026


पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला तरी बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीवर उपाययोजना करण्या संदर्भात तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत दुष्काळ आढावा बैठक घेतली.

बैठकीत जनावरांचा चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करनेकामी प्रस्ताव शासनास सादर करणे, पीक पंचनामे, वाडेवस्त्यांवर पाणी टँकर व्यवस्था, पीक विमा भरपाई तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणेबाबत आमदारांनी सूचना केल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे वास्तुनिष्ठ आणि सत्य अहवाल तयार करून आनेवारी 50% च्या आत दाखवावी, याबाबत निर्देश देखील दिले. वेळेप्रसंगी शेतात जाऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आ.कांदे यांनी केले.

बैठकीला प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, मनमाड व नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामसेवक तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, विविध पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
.